‘हँडसम’ फौजदार अभिनेत्याचा दुर्दैवी मृत्यू

ravindra mahajani biography
ravindra mahajani biography

ravindra mahajani biography ‘हँडसम’ फौजदार अभिनेत्याचा दुर्दैवी मृत्यू

ravindra mahajani biography देखण्या, रुबाबदार रूपाने मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे आणि चित्रपटांचा प्रवाहही बदलायला लावणारे कलाकार म्हणजेच अभिनेते रवींद्र महाजनी. या अभिनेत्याचा घरात दुर्दैवी ravindra mahajani death मृत्यू झाला.तळेगाव दिघे येथे ते भाड्याच्या फ्लॅट मध्ये राहत होते. दोन दिवस त्यांचा दरवाजा उघडला नाही म्हणून शेजाऱ्याने पोलिसांना कळविले तेंव्हा त्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.

in article

त्यांचा मुलगा ravindra mahajani son गश्मीर महाजन हा मुंबई येथे राहतो.

अभिनय करणं आणि पैसे कमावणे यातून या कलावंताने सुवर्णमध्य काढला. दिवसा निर्मात्यांना भेटता यावे, म्हणून रात्री टॅक्सी चालवायची, हे ठरवले. रात्री पैसे कमवायचे आणि दिवसा आपले अभिनयाचे वेड जपण्याचा या कलावंताने प्रामाणिक प्रयत्न सुरु केला. तीन वर्ष मुंबईत टॅक्सी चालवली. त्याच्या अनेक नातेवाईकांनी हा टॅक्सी चालवतो, म्हणून संबंध तोडले. पण मराठी चित्रपटांमध्ये यश मिळाले आणि सर्व नातेवाईक परत नीट बोलू लागले. या कलावंताने प्रामुख्याने मराठी व काही हिंदी, गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘झुंज’ या मराठी चित्रपटाद्वारे या कलाकाराने चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी भूमिका साकारलेले ‘लक्ष्मी’, ‘दुनिया करी सलाम’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’ हे चित्रपट विशेष गाजले. या कलाकाराने  चित्रपट दिग्दर्शक व निर्माता म्हणूनही काम केले आहे. ऐतिहासिक कालखंडातील आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासातील अतीव महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकणाऱ्या आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ या चित्रपटात या कलाकाराने नुकतीच एक महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेचे विशेष कौतुक झाले. मराठी चित्रपटांमध्ये एक काळ गाजवणारे आणि आपल्या प्रभावी व्यक्तीमत्वाने प्रेक्षकांच्या विशेषत: तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजवणारे त्या काळचे ‘हँडसम हंक’ हरहुन्नरी कलावंत म्हणजेच दिलखुलास अभिनेते रवींद्र महाजनी.

ravindra mahajani रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगावचा.  रवींद्र दोन वर्षांचे असताना वडिलांनी नोकरीसाठी मुंबईला मुक्काम हलवला.रविंद्र महाजनी यांचे वडिल ह.रा.महाजनी हे स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार होते. एका प्रतिथयश आणि लोकप्रिय वर्तमानपत्राचे ते संपादक होते. वडिलांची शिकवण रविंद्र महाजनी यांनी आयुष्यभर लक्षात ठेवली. वडील त्यांना म्हणायचे, ‘तु कुठलंही काम कर. पण प्रामाणिकपणे कर. त्या कामाशी बेईमानी करू नकोस. बघ, यश तुझंच आहे.’ हेच त्याचे वाक्य लक्षात ठेवून त्यांनी प्रामाणिकपणे मेहनत सुरु केली. शाळेत असल्यापासूनच रवींद्र यांना मात्र अभिनयाची अतिशय आवड. मोठे झाल्यानंतर नाटकात-चित्रपटातच जायचे, हे त्यांनी आधीच ठरवून टाकले होते. शाळेतही ते स्नेहसंमेलनात, अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत. इंटर सायन्सच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यावर निराश झालेल्या रवींद्र यांना वडिलांनी पदवी शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला. मग रवींद्र यांनी खालसा महाविद्यालयामध्ये बी.ए.साठी प्रवेश घेतला. त्या वेळी त्यांच्या महाविद्यालयात रॉबिन भट्ट, रमेश तलवार, अवतार गिल, शेखर कपूर अशी मंडळी होती. सगळ्यांनाच अभिनयाची आणि चित्रपटांची अत्यंत आवड. शिक्षण पूर्ण करून चित्रपटात जायचे, असे सगळ्यांनी तेव्हाच ठरवून टाकले होते. त्यावेळी ते वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नाटके सादर करायचे. अशोक मेहताही त्यांच्यासोबत असायचे. चित्रपटात गेल्यावर काय काय करायचे, हेही त्याच वेळी त्यांचे ठरून गेले होते. शेखर कपूर यांना दिग्दर्शनाची आवड होती. रमेश तलवार-अवतार गिल यांच्यासोबत रवींद्र महाजनींना अभिनयाची आवड होती. रॉबिन भट्ट यांना लेखनाची आवड होती, तर अशोक मेहता यांना कॅमेरामन व्हायचे होते. आपापल्या आवडीप्रमाणे सगळे त्या त्या क्षेत्रात स्थिरावले आणि यशस्वी झाले.

ravindra mahajani biography

 

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रवींद्र महाजनी यांनी चित्रपटसृष्टीत नशीब अजमावण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वडिलांच्या निधनानंतर आर्थिक जबाबदारीही त्यांच्यावर पडली होती, त्यामुळे कमाई करणे आवश्यक होते; म्हणून काही काळ त्यांनी छोटी-मोठी कामे केली. काही वर्षे टॅक्सीसुद्धा चालवली. संपादकांचा मुलगा टॅक्सी चालवतो म्हणून नातेवाइकांकडून बरीच टीकाही सहन करावी लागली, पण रवींद्र महाजनी यांना त्यांचे ध्येय माहीत होते. मधुसूदन कालेलकर यांच्या ‘जाणता अजाणता’ या नाटकातून महाजनींना खर्‍या अर्थाने पहिली संधी मिळाली. महाजनींनी साकारलेली त्यातली मुख्य भूमिका गाजली. त्यानंतर कालेलकरांनी खास त्यांच्यासाठीच ‘तो राजहंस एक’ हे नाटक लिहिले. शांतारामबापूंनी या नाटकाचा एक प्रयोग पाहिला आणि रवींद्र महाजनींना ‘झुंज’ या चित्रपटात मुख्य भूमिकेची संधी दिली. १९७४ साली आलेला हा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर रवींद्र महाजनी नावाचा नवा तारा मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला. या चित्रपटाने त्यांचा नऊ वर्षांचा संघर्ष संपवला. ‘झुंज’ने रौप्यमहोत्सवी यश मिळवले आणि महाजनींकडे मराठी चित्रपट निर्मात्यांची रांग लागली. त्यानंतर ‘आराम हराम आहे’, ‘लक्ष्मी’, ‘लक्ष्मीची पावलं’, ‘देवता’, असे अनेक यशस्वी चित्रपट महाजनींच्या खात्यावर जमा झाले. ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’, असे विनोदी ढंगाचे हलकेफुलके चित्रपटही त्यांनी केले आणि त्यांनाही यश मिळाले. त्या काळात तमाशापटांची आणि ग्रामीण पार्श्‍वभूमीच्या चित्रपटांची चलती होती. तरीही महाजनींसारखा ‘तारा’ मिळाल्यानंतर मराठी निर्मात्यांनी त्यांच्या शहरी रूपाला शोभून दिसतील, अशा कथा शोधायला सुरुवात केली आणि मराठी चित्रपटांतील सामाजिक आशय पुन्हा वाढीला लागला. चांगली कथा-पटकथा आणि रवींद्र महाजनी यांचे देखणे रूप, हे समीकरण १९७५ ते १९९० या काळात छान जुळून आले होते. अरुण यांच्या आकस्मिक निधनानंतर महाजनींनी त्यांच्या ‘बेलभंडार’, ‘अपराध मीच केला’ या नाटकांचे अनेक प्रयोग केले. सन १९९० नंतर महाजनी चरित्र भूमिकांकडे वळले. काही दूरचित्रवाणी मालिकांमध्येही त्यांनी काम केले. ‘सत्तेसाठी काहीही’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी निर्मितीच्या आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात प्रवेश केला. कलाकाराने कायम नवनवीन शिकत आणि करत राहायला हवे, असे त्यांना वाटते. त्यासाठीच त्यांचे प्रयत्न सुरू असतात.

ravindra mahajani cinema   ‘कुणी कुणाच्या पोटी आणि कुणाच्या घरात जन्माला यायचे हे जर आपल्या हातात असते तर माझी रत्नावली नक्कीच तुमच्या या घरात जन्माला आली असती’ हा ‘हळदीकुंकू’ या सिनेमातील रवींद्र महाजनी आणि जयवंत दळवी यांच्यातील हा संवाद मनात इतका खोलवर रुतला आहे की, आज दोन-तीन दशकांनंतरही तो लख्ख आठवतो. कनिष्ठ जातीतील प्रेयसीला सून म्हणून स्वीकारण्यास यातील नायक रवींद्र महाजनी यांचे वडील तयार नसतात. त्यावेळचा हा प्रसंग आहे. हा संवाद त्या सिनेमाचा एक भाग असला तरी प्रत्येक संवेदनशील माणसाला निश्चितच अस्वस्थ करणारा आहे, मंथन करायला लावणारा आहे. ‘हळदी-कुंकू’ हा चित्रपट छान आहे.आपल्या वडिलांचा आग्रहाखातर प्रतिष्ठापायी, अभिनेता रवींद्र महाजनी यांना अभिनेत्री रंजना यांच्याशी लग्न करण्याची सक्ती केली जाते. पण आपली वर्गमैत्रिण असणाऱ्या अभिनेत्री उषा नाईक यांच्यावर त्यांचं प्रेम असतं. चित्रपटाची कथा साधी-सरळ असली तरी उत्कृष्ट अभिनय, सुमुधुर गाणी त्याच बरोबर प्रेमाचा त्रिकोण झाल्यामुळे सन १९७९ साली हा चित्रपट खूप गाजला होता. त्यावेळी मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेला देखणा,रुबाबदार अभिनेता हीच रवींद्र यांची खरी ओळख. मराठीला त्यांच्या रूपाने एक हिंदीच्या तोडीचा अभिनेता लाभला. रवींद्र महाजनी यांची रंजना,उषा नाईक,आशा काळे यांच्याबरोबर अनेक चित्रपटात जोडी जमली. ‘मुंबईचा फौजदार’,’हळदी कुंकू’,’दुनिया करी सलाम’,’गोंधळात गोंधळ’ या चित्रपटात त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. हिंदीत देखील त्यांनी काही चित्रपट केले. परंतु त्यात त्यांना तितके यश मिळाले नाही. त्यांनी ‘सत्ताधीश’ नावाचा चित्रपट देखील निर्माण केला परंतु तो फारसा चालला नाही. त्यांचे चिरंजीव गश्मीर महाजनी यांनी देखील  चित्रपटसृष्टित पदार्पण केले असून ते सुद्धा वडिलाच्या पाऊलवाटेवर यशस्वीपणे पुढे जात आहेत.’पानिपत’ व ‘देऊळ बंद’ या दोन चित्रपटांमध्ये या बापलेकांनी सोबत अभिनय केला आहे.

ravindra mahajani biography as chocolate boy  सत्तरच्या दशकात आपल्या प्रसन्न व्यक्तीमत्वामुळे रविन्द्र महाजनी मराठी चित्रपटसृष्टितील ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखले जायचे. त्यांनी मराठी सोबतच काही हिंदी आणि गुजराती चित्रपटात पण अभिनय केला आहे. मराठीमध्ये त्यांनी ”जुलुम” या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. “आराम हराम आहे”, “मरी हेल उतारो राज”, “दुनिया करी सलाम”, “तीन चेहरे”, “चोरावर मोर”, “गोंधळात गोंधळ”, “लक्ष्मीचे पाऊले”, “बेआबरू”, “मुंबईचा फौजदार”, “बढ़कर”, “गंगा किनारे”, “नैन मिले चैन कहाँ”, “कानून कानून है”, “वहम” आणि “गूंज” हे त्यांचे प्रमुख चित्रपट आहेत. देखण्या, रुबाबदार रूपाने मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे आणि चित्रपटांचा प्रवाहही बदलायला लावणारे कलाकार अशीच रवींद्र महाजनी यांची खरी ओळख आहे.

आशिष निनगुरकर

९०२२८७९९०४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here