हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर आढळली संशयास्पद बोट
रायगड
in article
Raigad harihareshwar news रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरच्या किनारयावर आज दुपारी एक संशयास्पद बोट आढळून आली आहे.. बोटीत ३ एके ४७ रायफल्स सापडल्या असून रायगड पोलीस चौकशी करीत आहेत..
जिल्ह्यात हायअँलर्ट जाहीर करण्यात आला असून सर्वत्र नाकेबंदी केली जात आहे.. एटीएसचे पथक लवकरच रायगडमध्ये पोहचत आहे..
संशयास्पद बोटीची सखोल चौकशी करून जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेची सरकारने काळजी घ्यावी अशी मागणी स्थानिक आमदार अदिती तटकरे यांनी केली आहे..
1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील स्फोटके श्रीवर्धन तालुक्यातच उतरवली गेली होती त्यामुळे या घटनेचं गांभीर्य अधिक वाढले आहे..