मुख्याध्यापक कदम यांचे ६५हजार रुपयाची झाली चोरी…

मुख्याध्यापक कदम

बापरे गुगल पे खात्यातून मुख्याध्यापक कदम यांचे ६५हजार रुपयाची झाली चोरी…IMG 20210207 WA0033

तालुक्यातील राजूर येथील शिवराज कदम यांनी आपल्या गुगल पे खात्यातून पैसे का जात नाही म्हणून ग्राहक सेवा केंद्राला फोन केला नी त्यातच ते फसले फेक अकाउंट ला फोन जोडला गेला नी समोरच्या आंध्रप्रदेश मधील हिंदी भाषिक व्यक्तीने त्यांना दुसऱ्या मोबाईल वरून फोन करण्यास सांगून त्यांच्या खात्याची माहिती घेत  त्यांचे ऑनलाईन खात्यातून चक्क ६५ हजार रुपये काढून फोन कट केला आपण फसलो गेल्याचे लक्षात येताच कदम यांनी राजूर पोलिसांकडे धाव घेतली मात्र नगर येथे सायबर क्राईम ला तक्रार द्यावी लागेल असे सांगण्यात आले .तर राजूर येथील सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी सायबर क्राईम चे अधिकारी कोळी यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली .त्याप्रमाणे रविवारी नगर येथे तक्रार दखल करण्यासाठी कदम गेले त्यापूर्वी स्टेट बँकेच्या टोल फ्री क्रमांक तसेच राजूर स्टेट बँकेचे शाखाधिकारी कुमावत यांना संपर्क करत घटनेची माहिती दिली .ज्या क्रमांकावरून फोन आला त्याच्या क्रमांक९१८७७७७६५८३८ असा असून त्या क्रमांकावर फोन केला असता तो क्रमांक स्विच ऑफ दाखवत गुगल पे खात्यातून मुख्याध्यापक कदम यांचे ६५हजार रुपयाची चोरी झालीनी  असल्याचे त्यांनी  सांगितले .आज रविवार असल्याने त्यांची फसवणूक झाली त्यामुळे त्यांना पेमेंट थांबवता आले नाही .या घटनेमुळे गुगल पे अकाऊंट असणारे लोक घाबरले आहेत .मात्र आज एका प्रामाणिक मुख्यद्यापकला ६५हजाराचा चुना लावला गेला .सोबत आपल्या घरी त्यांना पैसे पाठवायचे होते तेही पाठवत आले नाही.केवळ १४९९ रुपये फोन बील गेले नाही म्हणून ग्राहक सेवा केंद्राला फोन केला व ते फेक अकाऊंट निघाल्याने शिक्षकाची फसवणूक झाली .शेवटचे बटन दाबले नी त्यांच्या खात्यातून ६५हजार वर्ग झाले . फोटो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here