ट्रक रिक्षाच्या धडकेत 5 ठार चार जखमी;दोन बालकांचा समावेश

5 जण ठार

 

बीड दि 7 मार्च ,प्रतिनिधी

in article

बीड पासून अवघ्या 6 ते 7 किमी अंतरावर बीड -परळी रस्त्यावर पांगरबावडी जवळ भरधाव ट्रक ने अपे रिक्षा ला उडविल्याची घटना सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घडली .या घटनेत 5 जण ठार झाल्याची माहिती आहे.घटनास्थळी पोलीस पोहचले असून जखमींना बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

 

ट्रकचालकाने निष्काळजीपणाने ट्रक चालवत पांगरबावडी येथे एका ट्रक ने अपे रिक्षा ला तर घोडका राजुरी येथे दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातामध्ये रिक्षातील 5 जण ठार झाले असून यामध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. अपघातात चारजण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हारुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अपे रिक्षा

पोलीससुत्रांच्या माहितीनुसार, वडवणी येथून एक अपे रिक्षा प्रवाशी घेऊन येत होता. यावेळी बीडकडून वडवणीकडे जाणाऱ्या ट्रकने (एमएच-09 सीव्ही-9644) पांगरबावडी येथे रिक्षाला जोराची धडक दिली. या अपघातात रिक्षातील तबसुम अबजान पठाण, शारो सत्तार पठाण, रिहाण अजान पठाण (वय 13), तमन्ना अबजान पठाण (वय 8) व अन्य एक अशी मयतांची नावे आहेत. तर रिक्षा चालक सिद्धार्थ शिंदे, जायबाई कदम, मुजीब कुरेशी, अश्विनी गोविंद पोकळे, गोरख खरसाडे अशी जखमींची नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यानंतर या ट्रकने घोडकाराजूरी  येथे  एका दुचाकीस धडक दिली. त्यानतर ट्रक रस्त्याच्याकडेला खड्डयात जाऊन पलटी झाला.
घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोउपनि पवनकुमार राजपुत यांच्यासह आदींनी धाव घेतली आहे. ट्रक चालक फरार झाला असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

आणखी वाचा:जागतिक महिला दिनाच्या ऑनलाईन कार्यशाळेत प्राजक्ताताई धस यांचा सहभाग

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here