मागील वर्षी पहिल्या आठवड्यात अंबीत जलाशय भरला होता . यावर्षी दोन दिवस उशिरा जलाशय भरला असून पाणलोट व लाभ क्षेत्र्तील शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे .
शेतकरी गाळ तुडवणे रोप लावणीच्या तयारीत आहेत .छोठे मोठे ओढे नाले भरून वाहत असल्यामुळे हा लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे .
सयाजी अस्वले (सरपंच कुमशेत ) अंबीत जलाशयात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून हा गाळ उन्हाळ्यात जलसंपदा विभागाने काढल्यास या जाल्ष्याची क्षमता वाढेल तसेच या मातीचा उपयोग पाणलोट क्षेत्रातील शेतकर्यांना होईल.
तसेच या जलाशयातून पायातून लिकेज असून हे गळती थांबवून पाण्याची उधळपट्टी थांबणे आवश्यक आहे .
या लघु पाटबंधारे विभागच्या ठेकेदाराने काही काम अपूर्ण ठेवले असून ते पूर्ण करण्याची आवश्यकता आहे .
असून ३०० क्युसेक्सने विसर्ग चालू आहे . मात्र या प्रकल्पाचे कामे अपूर्ण असून गळतीचे काम संगमनेर लघु पाटबंधारे विभागाने केल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले आहे . मात्र या प्रकल्पाचे गेट जीर्ण अवस्थेत असून तरुणपणातच वार्धक्य आल्याचे चित्र समोर आले आहे .
जलाशय पूर्ण क्षमतेने भरले असून ३०० क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे .