तक्रार करायला आलेल्या महिलांवर लाठीचार्ज करणे ही दंडुकशाही

लाठीचार्ज

तक्रार करायला आलेल्या महिलांवर लाठीचार्ज करणे ही दंडुकशाही – आ. प्रा. देवयानी फरांदे

नाशिक दि 29 डिसेंबर/प्रतिनिधी
तक्रार करायला आलेल्या महिलांवर लाठीचार्ज करणे ही दांडेलशाही असल्याचे मत आ. देवयानी फरांदे यांनी व्यक्त केले. इंदिरानगर येथील घटनेबाबत पत्रकारांना प्रतिक्रिया देताना आ. फरांदे यांनी हे मत व्यक्त केले. इंदिरानगर येथील अधिकारी हे आपल्या पदाचा दुरुपयोग करून विनयभंगासारख्या घटनांना दाबण्याचा प्रयत्न करत असून ही महिलांची मुस्कटदाबी असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस आ.प्रा. देवयानी फरांदे यांनी केला आहे.

in article

हेही वाचा:नाशिक येथे आर्मी कॉम्बेक्ट एव्हीएशन च्या प्रशिक्षणार्थींना विग्ज प्रदान

वडाळागावातील सादिकनगरमधील एका महिलेचा डॉक्टरकडून विनयभंग करण्यात आला. या भागातील काही महिला माझ्याकडे त्या डॉक्टरच्या बाबतीत तक्रार घेऊन आल्या होत्या. या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी म्हणून उपायुक्त यांना भेटण्यासाठी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गेली असता. त्या महिलाही तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे येथे आलेल्या होत्या परंतु पोलीस निरीक्षक श्री. निलेश माईनकर यांनी या महिलांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांच्यासोबत उद्धटपणाचे बोलणे व लाठीचार करण्यास सुरुवात केली. व बेकायदेशीरपणे जमाव जमविल्याची माहिती देत सदर प्रकरणी माझ्यासह महिलांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. यामुळे भविष्यात महिला तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन येथे जाणे देखील सुरक्षित वाटणार नसल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

काल इंदिरानगर येथे कोणताही मोर्चा नव्हता महिला तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन येथे आलेल्या होत्या त्याच्याकडे कोणताही झेंडा नव्हता त्या घोषणा देत नव्हत्या किंवा कोणतेही निवेदन देण्यात आलेले नाही हे स्पष्ट करतांना मजोर अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात न आल्यास मात्र मोर्चा काढणे भाग पडेल असा इशारा त्यांनी दिला. तसेच पोलिस स्टेशन येथे तक्रार करण्यास जाणे गुन्हा कसा असू शकतो असा सवाल उपस्थित केला.

दरम्यान तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलांवर लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्याचा पोलीस आयुक्तांकडून जाहीर सत्कार कसा करू शकतात यातून जनतेत काय संदेश दिला जात आहे असा सवाल आ.प्रा. देवयानी फरांदे यांनी उपस्थित केला. पोलीस निरीक्षक श्री. निलेश माईनकर यांची तात्काळ बदली करून या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच महिलांना दिल्या जाणाऱ्या वागणुकी संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन या प्रकरणाची तक्रार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here