दलीतमित्र संघाचे राज्य उपाध्यक्ष संतु आढव ह्यांच निधन

दलीतमित्र

अहमदनगर- प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर दलीतमित्र संघाचे राज्य उपाध्यक्ष व संघाच्या स्थापने पासूनचे विश्वस्थ संतु पुंजा आढव ह्यांच आज ३० ऑगस्ट रोजी दुपारी अल्पशा आजाराने संगमनेर येथील एका खाजगी हॉस्पिटल मध्ये दुःखद निधन झालं.

दलीतमित्र संतु आढव ह्यांच मृत्यूसमयी वय ८६ वर्षाच होत.त्यांच्या पश्चात पत्नी,२ मुलं,१मुलगी,नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.नगर जिल्हयातील अकोले तालुक्यातील मौजे लिंगदेव येथील ते रहिवाशी होते.

in article

अत्यल्प शिक्षित असून सुद्धा त्यांनी अवघ आयुष्य निस्वार्थ समाज सेवेसाठी अर्पण केलं.आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहास प्राधान्य क्रम न देता प्रसंगी सर्वे भवन्तु सुखीन: साकारण्याचा आजीवन प्रयत्न केला.त्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाने डॉ बाबासाहेब आंबेडकर दलीतमित्रपुरस्काराने सन्मानित केले.रिपाई च्या अनेक, राज्य आणि राष्ट्रीय नेत्या समवेत ते दलित, उपेक्षित जणांच्या कल्याणार्थ प्रयत्नरत राहिले.अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यानि आपला व कुटुंबीयांचा उदरनिर्वाह केला.त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.

दलीतमित्र संतु आढव यांचे कार्य

महाराष्ट्र राज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलीतमित्रसंघाचं एक ऋषितुल्य व संघाशी आणि उपेक्षित वर्गाशी शेवटच्या श्वासापर्यंत इमान ठेवणार एक थोर,निडर, व्यक्तिमत्व संघाने व राज्याने गमावल्याअश्या आशयाच्या प्रतिक्रिया संघाचे कार्यध्यक्ष दलीतमित्र पत्रकार डॉ. विजय निलावार,अध्यक्ष दलीतमित्र नरोत्तम चव्हाण पुणे, सरचिटणीस दलीतमित्रयोगेश वागदे नागपूर,कोषाध्यक्ष दलितमित्रभूषण दडवे नागपूर सह संघाच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी दिल्या आहेत.

 

आणखी वाचा :मंदिरे उघडण्यासाठी आ.सुरेश धस यांचे अनोखे आंदोलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here