पंतप्रधान नरेंद्र मोदी कड्यातील नागरिकांशी साधणार संवाद

Pm narendra modi man ki baat
Pm narendra modi man ki baat

Pm narendra modi man ki baat : कड्यातील  नागरिकांशी साधणार संवाद

 

in article

कडा

Pm narendra modi man ki baat ,पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मन कि बात या कार्यक्रमातून बीड जिल्ह्यातील कडा येथील पालामध्ये राहणाऱ्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

पंतप्रधान नरेद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन कि बात या कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधत असतात. एप्रिल महिन्यातील रविवारी 24 एप्रिल रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात ते कडा येथील महावितरण कंपनीच्या जवळ आणि पाल टाकून राहत असलेल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत.यासंदर्भातील माहिती भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शंकर देशमुख यांनी दिली.

Read More : दहावी बारावीचा निकाल वेळेत लावणार-वर्षा गायकवाड

Pm narendra modi man ki baat live today

देशातील विविध भागातील नागरिकांशी विविध विषयावर ते संवाद साधणार आहेत. भाजपचे शंकर देशमुख यांनी या पालावर मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वस्तूंचे वाटप केले होते. या संदर्भातील माहिती थेट मोदी यांच्यापर्यंत पोहोचली. भटक्या कुटुंबातील हे नागरिक असून त्यांच्या समस्या संदर्भात मोदी जाणून घेणार आहेत.

यासाठी मन कि बात prime minister narendra modi man ki baat  कार्यक्रम कव्हर करणारी टीम कडा येथे येत आहे. हा संवाद व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here