विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनात १५ आरोग्यदायी पदार्थांचा समावेश फक्त कागदावरच

pupils in beed not having proper mid day meal
pupils in beed not having proper mid day meal

मोफत गणवेश मिळणार कधी?!:- डॉ.गणेश ढवळे 

in article

लिंबागणेश

pupils in beed not having proper mid day meal प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासुन पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या १५ पाककृती निश्चित करण्यात आल्या असुन ३ संरचित आहार पद्धती नुसार व्हेजिटेबल पुलाव, नाचणी सत्त्व,अंडा पुलाव,तांदळाची खिचडी अशा पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांची खिचडीपासुन सुटका होणार असुन निश्चित केलेल्या पाककृती मध्ये व्हेजिटेबल पुलाव,अंडा पुलाव,मसाले भात,मोड आलेली मटकीची उसळ, मटार पुलाव,गोड खिचडी,मुगडाळ, खिचडी,चवळी खिचडी,मुग,शेवगा,वरण भात,तांदळाची खीर,चणा पुलाव, नाचणीचे सत्त्व, सोयाबीन पुलाव,मोड आलेले कडधान्य आदी.१५ पदार्थांचा आस्वाद घेता येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे मात्र वस्तुस्थिती वेगळीच असुन सद्यस्थितीत तांदळापासून बनविलेल्या पाककृतीच्या स्वरूपात पोषण आहार दिला जात आहे.

शालेय पोषण आहार पुरवठादार महाग वस्तुंची कमतरता दाखवून स्वस्त असणा-या मटकी, हरभरा,वाटाणा, मसुर,मुगदाळ यांचाच शाळांना पुरवठा करण्यात येत आहे.केंद्र शासनाने दिलेल्या सुचनेनुसार विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये स्थानिक पातळीवर उपलब्ध अन्नधान्य, तृणधान्य व अन्य पदार्थांचा समावेश करून आहाराचा दर्जा आणि पौष्टिकता वाढविणे, आहारात वैविध्य आणण्यासाठी पाककृती सुधारणा समिती नियुक्त करण्यात आली होती.

उन्हाळ्यात प्यायला पाणी नाही , परसबागेतील भाजीपाला आहारात मिळणार कधी??

—-

 शिक्षण विभागाकडून पात्र शाळांमध्ये निर्माण केल्या जात असलेल्या परसबागातुन उत्पादीत भाजीपाला,फळे यांचा समावेश विद्यार्थ्यांच्या आहारात होत असल्याने विद्यार्थ्यांना ताजा,सकस आहार मिळण्यास मदत होत असल्याचे नमूद केले आहे. मात्र जिल्ह्यातील किती शाळांमध्ये परसबाग आहे आणि मुख्य म्हणजे उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना प्यायला पाणी नाही आणि परसबाग कशी जगवायची असा प्रश्न शाळेतील शिक्षकांनी उपस्थित केला असुन केवळ कागदावर छान असणारी योजना वास्तवात मात्र उतरताना दिसत नाही.

मोफत गणवेश आणि बुट सॉक्स मिळणार कधी???

—-

राज्यात” एक राज्य एक गणवेश” योजनेची अंमलबजावणी २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येत असून या अंतर्गत शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इयत्ता पहिली ते आठवी सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन यामध्ये एक नियमित स्वरुपाचा गणवेश तर स्काऊट व गाईड या विषयासाठी दुसरा गणवेश असणार आहे.महिला आर्थिक विकास महामंडळाकडून गणवेशाच्या शिलाईचे काम सुरू असुन लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात येत असली तरी नेमका गणवेश मिळणार कधी?? हा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.गणवेशा बरोबरच मुलांना बुट आणि सॉक्स सुद्धा मिळाले नाहीत.गतवर्षी एका विद्यार्थ्यांसाठी एक बुट जोडी आणि दोन सॉक्स जोड यासाठी १७० रूपये निधी देण्यात आला होता.यावरुन कोणत्या दर्जाचे साहित्य मिळत असेल याची कल्पनाच न केलेली बरी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here