राज्यात दहावीच्या परीक्षा रद्द;आगामी 15 दिवस कडक लॉक डाउन असणार

आषाढी एकादशी

 

मुंबई दि 20 एप्रिल प्रतिनिधी

in article

राज्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता राज्यात उद्यापासून उद्या सायंकाळपासून लॉकडाउन ची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

तसेच राज्यातील इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा ही शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड करणार असल्याची माहिती त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली।राज्यात आगामी पंधरा दिवसांमध्ये कडक लॉकडाउन लागणार असल्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सविस्तर माहिती देणार असल्याचे या बैठकीनंतर विविध मंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार राज्यातील इयत्ता दहावीच्या परीक्षा बोर्ड परीक्षा रद्द करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाल्याचे टोपे यांनी सांगितले. त्यानंतर उद्या राज्याचे मुख्यमंत्री कडक लॉकडाऊन ची घोषणा करणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here