पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या मुंबईच्या 4 विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

4 students of Mumbai who came for monsoon tourism drowned
4 students of Mumbai who came for monsoon tourism drowned

खालापूरातील पोखरवाडी येथे पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या मुंबई रिझवी कॉलेज च्या ४ विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू 

in article

रायगड

4 students of Mumbai who came for monsoon tourism drowned जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या खालापूरातील पोखरवाडी येथे आज दिनांक २१ जून रोजी  पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या मुंबई रिझवी कॉलेज च्या ४ विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे.

 या ग्रूपमध्ये एकूण ३७ जण होते . त्यापैकी १७ मुली होत्या. सोंडाई किल्ल्यावर हे सर्वजण ट्रेकिंगसाठी आले होते. तेथून धावडी नदीच्या बंधाऱ्यावरिल सांडव्यात डुंबण्याचा आनंद घेत असताना ही दुर्दैवी घटना घडली. 

खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे आणि कर्मचारी यांचे मार्गदर्शनाखाली अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य आणि पोखरवाडीतील स्थानिक युवकांनी या ऑपरेशन मध्ये सहभाग घेतला.  

खालापूर तालुक्याचे उप विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम साहेब हे स्वतः घटनास्थळी दाखल झाले होते. 

एकलव्य सिंग ,ईशांत यादव ,आकाश माने ,रणत बंडा  अशी मृत युवकांची नावे आहेत. 

सर्वांचे शव चौक प्राथमिक आरोग्य केंद्रात आणली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here