Home Blog

शक्तिपीठ महामार्गाला बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा विरोध


बीड

farmers opposes shaktipeeth highway in beed राज्य सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाला बीड जिल्ह्यात विरोध होताना दिसून येत आहे. बीडच्या अंबाजोगाई आणि परळी तालुक्यातून शक्तिपीठ महामार्ग जाणार असून या ठिकाणचे शेतकरी या महामार्गाविरोधात आक्रमक झालेले दिसून आले आहेत.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! जनावरांसाठी मिळणार पशुधन अधिकारी !

जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई तालुक्यातील ज्या गावातुन शक्तिपीठ महामार्ग पप्रस्तावित आहे त्या अनेक गावांमध्ये सीमांकनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. वरवटी, सायगाव, पिंपळा धायगुडा, भारज, गित्ता या गावात शेतकऱ्यांनी एकत्र येत मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध केलाय. कोणत्याही परिस्थितीत आपल्या जमिनी या महामार्गाला न देण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेत यावेळी घोषणाबाजी केलीये. यावेळी एड.एल.एन. शिंदे, व्यंकट ढाकणे, खुर्शीद अली, संदीपान कांबळे आदी सह महिला शेतकऱ्यांनी देखील आपला सहभाग नोंदवला आहे. शेतकऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आपली मोजणी सोडून माघारी जावे लागले आहे.

नागपूर ते गोवा जाणाऱ्या या महामार्गाला आता राज्यभरातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून विरोध होताना दिसत आहे. या विकासकामाच्या विरोधात शेतकरी सुद्धा आक्रमक झाला आहे. दरम्यान कोल्हापूरमध्ये सुद्धा अत्यंत आक्रमक पद्धतीने शक्तीपीठला विरोध होत आहे. अशातच आता या विरोधाची धग बीड जिल्ह्यापर्यंत पोहचली आहे.



farmers opposes shaktipeeth highway in beedशक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची विभागीय परिषद संपन्न

शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची मंगळवार दि 8 रोजी लातूर या ठिकाणी विभागीय परिषद संपन्न झाली या परिषदेला परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार त्र्यंबकनाना भिसे, अखिल भारतीय किसान सभा राज्य अध्यक्ष कॉ.उमेश देशमुख कॉ. एड.अजय बुरांडे, गोकुळ दूध संघाचे संचालक प्रकाश पाटील, कॉ.शिवाजीराव मगदूम, कॉ.सम्राट मोरे, महेश खराडे, जलतज्ञ प्रा.देसरडा सर, एड. उदय गवारे, गोविंदराव घाटोळ, सचिन दाने, गजेंद्र येळकर, सतिश कुलकर्णी, संभाजी फरताडे, विजय पाटील, उमेश एडके यांच्यासह मराठवाड्यातील व इतर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र राज्य किसान सभा, प्रतिनिधी इतर शेतकरी संघटनाचे प्रतिनिधी त्यासोबतच पर्यावरण प्रेमी, पशु पक्षी प्रेमी, अर्थतज्ञ, 12 जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी, महिला, नागरिक उपस्थित होते.

सुरुवाती पासून विरोधच

शक्तिपीठ महामार्ग संदर्भात किसान सभा सुरुवातीपासून विरोध करत असून राज्यासह जिल्ह्यातील शेकडो एक्कर सुपीक, बागायती जमीन संपादित करून शेतकऱ्यांना कायम स्वरूपी भूमिहीन करत भिकेला लावणारा हा शक्तीपिठ महामार्ग असून नानाप्रकारे राज्यात शेतकऱ्यांना शेती व्यवसायापासून दूर करण्याचे आणि भांडवली हितसबंध जोपासायचे हे षडयंत्र हे सत्ताधारी करीत आहेत.जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई येथील अनेक गावांत या महामार्गाच्या सीमांकनास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करत आलेल्या अधिकाऱ्यांना मागारी पाठवले. शक्तीपिठ महामार्ग विरोधात किसान सभा शेतकऱ्यांच्या सोबत लढत याला विरोध करणार आहे.

एका युवा नेत्यांच्या हट्टापायी ४ भिक्षुकांचा बळी गेला – खासदार निलेश लंके

four beggers died ahilhyanagar civil hospital शिर्डी येथे भिक्षा मागून जगणाऱ्या ४९ भिक्षुकांना शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना विसापूर कारागृहात पाठवले त्यातील १० भिक्षुकांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते, त्यातील 2 दिवसात 4 भिक्षुकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, हे मृत्यू नसून हत्या आहे असा आरोप खासदार निलेश लंकेनी केला.

कर्जत,जामखेड तालुक्यातील १११ शाळांमध्ये विद्यार्थी गिरवतात ई-लर्निंग द्वारे धडे

खासदार लंकेंनी उपचार घेत असलेल्या भिक्षुकांची जिल्हा रुग्णालयात भेट घेत त्यांची तब्बेतीची विचारपूस केली, त्याचबरोबर प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर प्रश्न उपस्थित केले, या १० भिक्षुकांपैकी ३ जण रुग्णालयातून पळून गेले, या वेळी पोलीस आणि रुग्णालय प्रशासन काय करत होते, १० भिक्षुकांना रुग्णालयात आणल गेल त्यांना कारागृहात डांबून ठेवण्यात आले होते का ? असा प्रश्न देखील उपस्थित केला, तसेच मयत झालेल्या भिक्षुकांची इन कैमरा संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पोस्टमार्टम करून चौकशी करावी अशी मागणी या वेळी केली.

नाव न घेता माजी खासदार सुजय विखेंवर निशाणा

खासदार लंके म्हणाले एका युवा नेत्याच्या मागणीमुळे कधी नव्हे ती भिक्षुकांवर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबण्यात आले, ही प्रशासनाची चूक आहे. याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल यावेळी खासदार लंकेंनी उपस्थित केला.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! जनावरांसाठी मिळणार पशुधन अधिकारी !

मुंबई

Good news for farmers! Livestock officers will be available for animals! राज्यातील शेतकर्यांसाठी पशुसंवर्धन विभागाने महत्वाच्या निर्णय घेतला आहे . या निर्णयानुसार राज्यातील शेतकर्यांच्या पशुधनाची काळजी घेण्यासाठी आता पुरेसे पशुधन अधिकारी मिळणार आहेत. पशुसंवर्धन विभागाचे काम पूर्ण क्षमतेने करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले असून विभागातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

त्याअंतर्गत पशुसंवर्धन सेवा गट अ मधील पशुधन विकास अधिकारी संवर्गातील २७९५ पदे भरण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणी पत्र सादर करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

कर्जत,जामखेड तालुक्यातील १११ शाळांमध्ये विद्यार्थी गिरवतात ई-लर्निंग द्वारे धडे

ग्रामीण भागात पशुसंवर्धन विभागाचे काम गतीने व पूर्ण क्षमतेने होण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय आयुक्तालय तसेच त्यांच्या अधिनस्त क्षेत्रिय कार्यालयातील पशुधन विकास अधिकारी पद महत्त्वाचे आहे.

सुधारित आकृतीबंधानुसार महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ अंतर्गत पशुधन विकास अधिकारी संवर्गात एकूण ४६८४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सद्यःस्थितीत १८८६ पदे भरलेली असून २७९८ पदे रिक्त आहेत.

तसेच ३१ डिसेंबर २०२५ अखेर ८ पदे सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणार आहेत, अशी एकूण २८०६ पदे रिक्त होणार आहेत. ही पदे रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम होत होता. या गोष्टीची दखल घेत पशुसंवर्धन मंत्री मुंडे यांनी पाठपुरावा करून पशुधन विकास अधिकारी संवर्गातील पदे भरण्याचा निर्णय घेतला.

यापैकी सरळसेवा जाहिरात क्र. १२/२०२२ मधील प्रतिक्षायादीतील ११ पदे उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. उर्वरित २७९५ पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र सादर करण्यात आले आहे.

पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश देण्यात आले असून लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला कळविण्यात आले आहे. ही रिक्त पदे भरल्यानंतर विभागाचे कामकाज अधिक वेगाने होऊन ग्रामीण भागातील पशुपालक तसेच शेतकरी बांधवांना चांगल्या दर्जाची सेवा उपलब्ध होईल, असा विश्वास मंत्री मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

कर्जत,जामखेड तालुक्यातील १११ शाळांमध्ये विद्यार्थी गिरवतात ई-लर्निंग द्वारे धडे

अहिल्यानगर

Students in 111 schools in Karjat and Jamkhed talukas are taking lessons through e-learning आधुनिक तंत्रज्ञान युगामध्ये डिजिटल शिक्षण आवश्यक असून डिजिटल शिक्षण धोरण स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.

डिजिटल स्कूल या संकल्पनेअंतर्गत कर्जत तालुक्यातील ८७ व जामखेड तालुक्यातील २४ अशा १११ शाळेतील इंटरॅक्टिव्ह टच पॅनल आणि महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित डिजिटल ई लर्निंग सॉफ्टवेअरचे लोकार्पण सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जामखेडचे गट विकास अधिकारी स्वप्निल जाधव यांच्यासह जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते.

नियमबाह्य बेकायदेशीर परीक्षेला मराठवाडा शिक्षक संघाचा विरोध

सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचा आत्मविश्वास वाढवला आहे. शिक्षण हे तणावमुक्त असले पाहिजे, सृजनशिल असले पाहिजे यावर त्यांनी नेहमीच भर दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल शिक्षणाच्या पर्वाची सुरुवात झाली आहे. त्याला अनुसरूनच ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

आधुनिक तंत्रज्ञानातून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य साकारले जाणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सर्व विषयांची उकल अत्यंत सुलभपणे होणार आहे. रंगात्मक आणि चित्रात्मक पद्धतीने विद्यार्थ्यांना विषय समजून सांगता येणार आहेत. फळा, खडू, डस्टर ही संकल्पना आता मागे पडली आहे. यापूर्वीही विद्यार्थ्यांना इंटरॅक्टिव्ह टच पॅनल, डिजिटल बोर्ड उपलब्ध करुन देण्यात आले असून यानंतरही शाळांना अशाच पद्धतीची शिक्षण व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

शिक्षक हा शिक्षणाचा आत्मा आहे. शिक्षकांनीही आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणे ही काळाची गरज बनली आहे. शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचवत त्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार शिक्षण देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांमधील सृजनशिलतेला आवाहन करणारे आणि प्रोत्साहन देणारे हे स्मार्ट बोर्ड विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारी जादुई खिडकी आहे. डिजिटल युगामध्ये नवीन काय आहे हे विद्यार्थ्याला पहायला, ऐकायला आणि प्रात्यक्षिक करायला मिळाले तर यातून विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा उत्साह वाढून या माध्यमातून निश्चितच त्यांचे भविष्य घडू शकेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आजचे युग हे डिजिटल तंत्रज्ञानाचे आहे. पूर्वीच्या शिक्षण पद्धतीमध्ये आणि आजच्या शिक्षणामध्ये मोठे बदल झाले आहेत. आधुनिक युगाच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना टिकायचे असेल तर डिजिटल शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. चिकाटी आणि सतत ज्ञान मिळविण्याची भूक असेल तर यातून एक मोठे परिवर्तन घडू शकते. त्यामुळे हे डजिटल शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी पूरक ठरणार आहे. केवळ शिक्षकांनीच नव्हे तर पालकांनीसुद्धा विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जिल्ह्यातील १११ शाळांमधून आपण एकाचवेळी या इंटरॅक्टिव्ह टच पॅनलचे लोकार्पण केवळ डिजिटल तंत्रज्ञानामुळे करु शकत आहोत, हीच या तंत्रज्ञानाची ताकद असल्याचे सांगत हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवत त्यांचे कुतुहल जपण्याचे काम करावे. शिक्षण क्षेत्रात अनुकूल परिवर्तन घडविण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.

जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी प्रास्ताविक केले

विषय समजण्यास तंत्रज्ञानामुळे मदत झाल्याची विद्यार्थ्यांची प्रतिक्रीया


इंटरॅक्टिव्ह टच पॅनल आणि डिजिटल ई-लर्निंग सॉफ्टवेअरचे लोकार्पण कार्यक्रमादरम्यान जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता ६ वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या महेंद्र कोकाटे व प्रवीणराज गलांडे यांनी सभापती प्रा. राम शिंदे यांच्याशी संवाद साधला. इंटरॅक्टिव्ह टच पॅनलबाबत शिक्षकांनी संपूर्ण माहिती दिल्याने सर्व विषय समजण्यास मोठी मदत झाली. डिजिटल शिक्षणामध्ये सर्व विषयांबरोबरच संस्कृत विषयाचा समावेश असल्याने संस्कृत भाषेचे ज्ञान प्राप्त करुन घेण्यात सहजता येत आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेकडे यशस्वीपणे उचललेले हे पहिले पाऊल असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी सभापती प्रा.शिंदे यांचे आभारही व्यक्त केले.


नियमबाह्य बेकायदेशीर परीक्षेला मराठवाडा शिक्षक संघाचा विरोध

छ. संभाजीनगर

Marathwada Teachers’ Union opposes illegal and irregular examinations मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळात दिनांक 12 मार्च 2025 रोजी संस्थेअंतर्गत अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या अनुभवी शिक्षकांची 100 गुणांची परीक्षा आयोजित केलेली असून ही परीक्षा म्हणजेच शिक्षकांचा करण्यात येणारा अवमान होत आहे

ही परीक्षा शिक्षकांच्या व्यावसायिक प्रतिष्ठेच्या विरोधात आहे तसेच हा कायद्याचा आणि नियमाचा भंग आहे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळातील अनेक शिक्षक कर्मचाऱ्यांनी याला विरोध केला आहे.

हा अपमान शिक्षक कर्मचारी कदापिही सहन करणार नाही तरी या परीक्षा मंडळाने न घेता शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीसाठी संस्था अंतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन करावे जेणेकरून शिक्षकांच्या गुणवत्तेमध्ये निश्चितच वाढ होईल.

परंतु मंडळाने नियमबाह्य बेकायदेशीर या परीक्षांचे आयोजन करून शिक्षकांना मानसिक त्रास व शिक्षकांच्या आत्मसन्मानावर आघात करण्याचे कार्य केलेले आहे तरी या परीक्षा तात्काळ रद्द करण्यात याव्यात अन्यथा लोकशाही मार्गाने आपल्या संस्थेच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल .

असा इशारा मराठवाडा शिक्षक संघाचे छत्रपती संभाजीनगर चे (जिल्हा सचिव) भाई चंद्रकांत चव्हाण यांनी दिलेला आहे यांच्या नेतृत्वाखाली आज संस्था कार्यालयात संस्था पदाधिकारी त्रिंबकभाऊ पार्थिकर व प्रशासकीय अधिकारी एफ. एम. माळी सर यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी यावेळी संघटनेचे पदाधिकारी योगेश खोसरे विनोद केणेकर, अशोक ढमढेरे, विलास चव्हाण, दीपक वाघ, बाळू पवार, संतोष सुरडकर, नवनाथ मंत्री अजय कदम, विलास चांदणे, पद्माकर पगार, शितल कडवे, अरुणा चौधरी, सविता हिंगे, मानसी भागवत उपस्थित होते.

कोपरगावची लेक अनुष्का बनकर राज्याच्या संघात


श्रीरामपूर (गौरव डेंगळे)

3A साईड व्हॉलिबॉल फेडरेशन कप साठी महाराष्ट्र संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली होती. दिनांक ११ एप्रिल ते १३ एप्रिल दरम्यान हैदराबाद,तेलंगणा येथे होत असलेल्या फेडरेशन कप स्पर्धेसाठी कोपरगाव येथील श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी कुमारी अनुष्का बनकर हिची महाराष्ट्राच्या संघात निवड करण्यात आली आहे.

तसेच संघाच्या प्रशिक्षकपदी श्रीरामपूरचे नितीन बलराज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुरुष संघाचा कर्णधार म्हणून विनित शेट्टी व महिला संघाची कर्णधार म्हणून श्रीया गोठोस्कर यांची निवड करण्यात आली आहे.

फेडरेशन कप स्पर्धेसाठी तेलंगणा,महाराष्ट्र,दिव दमन,गुजरात,छत्तीसगड हरियाणा,पंजाब व मध्य प्रदेश या आठ राज्यांचे संघ सहभागी होणार असल्याची माहिती 3A साईड व्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व्ही एस ए राजू व सचिव श्री मारुती हजारे यांनी दिली.

स्पर्धेचे तांत्रिक अधिकारी म्हणून क्रीडा प्रशिक्षक श्री गौरव डेंगळे काम बघतील. निवड झालेल्या संघाचे गोदावरी बायोरिफायनरीचे (साखरवाडी)अध्यक्ष श्री सुहास गाडगे, प्राचार्य श्री के एल वाकचौरे,उपप्राचार्या शुभांगी अमृतकर,पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाणे,नेथलीन फर्नांडिस,क्रीडा विभाग प्रमुख डॉ धनंजय देवकर तसेच शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या..

निवड झालेल्या संघ पुढीलप्रमाणे!
महाराष्ट्र पुरुष संघ : विनित शेट्टी (कर्णधार),मोहम्मद सय्यद,सागर पूजारी,प्रीथमा,रंजित पुजारी,प्रीतम व विशाल यादव
प्रशिक्षक : योगेश तडवी

महिला महाराष्ट्र संघ:श्रीया गोठोस्कर (कर्णधार),संजना गोठोस्कर,उमा सायगावकर,उपतज्ञ कार्ले,अरमान भावे व अनुष्का बनकर.
मुख्य प्रशिक्षक : नितीन बलराज
संघ व्यवस्थापक: गीतांजली भावे

स्कूल बस झाडावर धडकली ; विद्यार्थी चालक जखमी

आष्टी
Ashti school bus accident शाळेला विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या स्कूल बस झाडाला धडकल्याची घटना आष्टी शहराजवळ घडली.येथील अहिल्यानगर बीड रस्त्यावरील बेलगाव चौकात हा अपघात झाला.


वटणवाडी येथून शाळेला विद्यार्थी घेऊन ही स्कूल व्हॅन आष्टी कडे जात होती. सकाळच्या सत्रातील शाळा असल्याने चालक मुलाला घेऊन चालला होता.

अचानक समोर आलेल्या कार ला वाचविण्याच्या प्रयत्नात चालक झाडावर जाऊन धडकला. हा अपघात इतका भयानक होता की यामुळे विद्यार्थी घाबरले.तर अचानक झालेल्या या घटनेमुळे विद्यार्थ्यांना धक्का बसला.

यामधे अनेक विद्यार्थी जखमी झालेले असून वाहन चालकाला चांगलाच मार लागलेला आहे. जखमींना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालय तसेच काहींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. नेमका अपघात कसा झाला याबाबत पोलिस तपास करत आहेत.

का फसला सागर कारंडे 61 लाखाला ?

marathi actor sagar karande cheated by women worth 61 lakh ऑनलाईन फ्रौड च्या गोष्टी सर्वत्र बोलल्या जातात मात्र त्यातून धडे घेताना कोणी दिसत नाही. या आभासी दुनियेतील मोहापायी अनेक नागरिक आपले पैसे गमावून बसतात. याला आता sagar karande comedyअभिनेतेही अपवाद नाहीत . तेही माणसेच आहेत .

मराठी चला हवा येऊ द्या chala hawa yeu dya cast मधील विनोदी अभिनेता सागर कारंडे याची फसवणूक झाल्याची बातमी समोर आली आहे. अर्थात तो या बाबत काहीही बोलायला तयार नाही . मात्र त्याची फसवणूक झाली हे नक्की !

नेमके काय झाले सागर कारंडे सोबत ? याची बातमीही मोठी रंजक आहे . या अभिनेत्याची तब्बल ६१.८३ लाखांना गंडा घातल्याचे वृत्त आहे. असे वृत्त होते की, फेब्रुवारी महिन्यात सागर कारंडेला अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअपवर एका महिलेचा मेसेज आला, संबंधित मेसेजमध्ये आलेल्या टेलिग्राम, इन्स्टाग्रामसह इतर काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील लिंक लाइक करण्याचे त्या मेसेजमध्ये सांगण्यात आलेले. प्रत्येक लाइकसाठी १५० रुपये मिळतील असा तो मेसेज होता. घरबसल्या पैसे कमावणे महागात पडल्याचे हे वृत्त सागरने फेटाळले असून त्याची उलट प्रतिक्रिया समोर आली.

Sagar Karande Cheated of Rs 61 Lakh

याप्रकरणी प्रतिक्रिया देताना सागरने म्हटले की, ‘सागर कारंडे नावाचा मी काही एकटा नाही, खूप आहेत. गुगलवर सर्च केलं तर खूप sagar karande news सागर कारंडे सापडतील.’ माध्यमांशी बोलताना सागरने अशी प्रतिक्रिया दिली.
ऑनलाइन फ्रॉड दरदिवशी उघडकीस येतात, अशावेळी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची फसवणूक झाल्याचे समोर आल्याने चाहत्यांना धक्का बसला होता. या कथित प्रकरणात असे समोर आलेले की, सोशल मीडियावर पोस्ट लाइक करण्यासाठी त्याच्याकडून ६१ लाखांहून अधिक रक्कम उकळण्यात आली. याप्रकरणी सायबर पोलिसांमध्ये (उत्तर विभाग) ३ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मीडिया रिपोर्टनुसार, सागर कारंडे नावाच्या व्यक्तीला आलेल्या मेसेजमध्ये संबंधित महिलेने टेलिग्राम आणि इन्स्टाग्रामच्या काही लिंक पाठवल्या होत्या. त्या लिंक लाइक करुन प्रत्येक लाइकचे १५० रुपये मिळतील आणि त्यातून घरबसल्या ६० हजार कमावती येतील असे आमिष दाखवण्यात आले. सागरचा विश्वास संपादन करण्यासाठी या भामट्यांकडून त्याला ११ हजार रुपये देण्यात आले आणि त्यामुळे त्याने हे काम सुरू ठेवले.

हेही वाचा : मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला

हळूहळू त्याला यामध्ये अधिक गुंतवणूक करण्यात भाग पाडले गेले. सागरने सुरुवातीला २७ लाख भरले आणि त्याचे काम सुरू ठेवले. त्यानंतर त्याने वॉलेटमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याला असे सांगण्यात आले की काम पूर्ण झाल्यानंतरच पैसे काढता येतील.

सागरला पुढे असे सांगण्यात आले की, त्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे आणि पैसे काढण्यासाठी १०० टक्के रक्कम भरावी लागेल. त्यानुसार त्याने १९ लाख रुपये आणि ३० टक्के कर भरला. एकूण त्याच्याकडून ६१ लाखांहून अधिक रक्कम या भामट्यांनी उकळली. घरबसल्या पैसे कमावण्याच्या आमिषाने त्याच्या हाती काहीच लागले नाही. उलट त्याने भरलेला कर चुकीच्या खात्यात गेल्याचे सांगून अधिक पैसे मागितले जात होते. सागरला संशय आल्यावर त्याने सायबर पोलिसांकडे धाव घेतली.

पहा न आहे ना कमाल ? तुम्ही फसू शकता ,अशा फसव्या लिंक्स आणि भूल थापांना बळी पडू नका .

आरोपींना सहकार्य करणाऱ्या पोलिसांच्या बदल्या करण्यात येतील – गृहराज्यमंत्री योगेश कदम

बीड,

state minister yogesh kadam meets beed sarpanch santosh deshmukh family सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपीना सहकार्य करणाऱ्या पोलिसांच्या बदल्या करा असे निर्देश गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले. या प्रकरणात सहभाग सिद्ध झालेल्या कोणाचीही गय केली जाणार नाही असेही ते म्हणाले.

श्री. कदम यांनी आज मस्साजोग येथे भेट दिली. यावेळी त्यांनी कै. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. कै. देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख तसेच मुलगी वैभवी देशमुख यांच्याशी चर्चा केली. सरकार या प्रकरणी खंबीरपणे देशमुख कुटूंबियांच्या पाठीशी आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

नांदेड-आलेगाव शिवारातील अपघातात सात महिलांचा मृत्यू ; तिघांना वाचवण्यात यश

देशमुख कुटूंबियांचे सांत्वन केल्यानंतर श्री. कदम यांनी आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती घेतली.

बीड तरुंगात कैदेत असणारा या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला अतिविशिष्ट दर्जा (VVIP) प्रमाणे वागणूक तुरूंगातील अधिकारी देत आहेत असा आरोप सातत्याने होत आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करणार असून कराड आणि त्याच्या सहकारी अरोपीना इतर कारागृहात हलविण्याबाबत कार्यवाही संदर्भात बोलेन असे त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.
उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून मी आलो आहे या अतिशय निर्गुण हत्याप्रकरणी कोणालाही सोडले जाणार नाही व आरोपीला फाशीच होईल या पद्धतीने आपण या प्रकरणाकडे पाहत आहोत असेही श्री कदम यावेळी म्हणाले.


नांदेड-आलेगाव शिवारातील अपघातात सात महिलांचा मृत्यू ; तिघांना वाचवण्यात यश

नांदेड

Nanded alegaon accident tractor fell into well 7 women died शेतमजुरीसाठी वसमत तालुक्यातील गुंज येथून नांदेड तालुक्यात आलेगाव शिवारात येत असलेल्या शेतमजुरांचे ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात सात महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची केली मदतीची घोषणा

या घटनेत दोन महिला आणि एका पुरुषाला वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Nanded alegaon accident tractor fell into well 7 women died
Nanded alegaon accident tractor fell into well 7 women died

या अपघातात गुंज येथील ताराबाई सटवाजी जाधव वय ३५, धुरपता सटवाजी जाधव वय १८, सिमरन संतोष कांबळे वय १८, सरस्वती लखन भुरळ वय २५, चौत्राबाई माधव पारधे वय ४५, सपना उर्फ मीना राजू राऊत वय २५ आणि ज्योती इरबाजी सरोदे वय ३० या सात महिलांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री निधीतून पाच लाखांची मदत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केली आहे

या अपघातातून पार्वतीबाई रामा भुरळ वय ३५, पुरभाबाई संतोष कांबळे वय ४० या दोन महिलांना आणि सटवाजी जाधव वय ५५ या एका पुरुषास विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

जवळपास पाच ते सहा तास हे बचाव कार्य चालले. निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, नांदेडचे तहसीलदार संजय वरकड, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन पथक, नांदेड महापालिकेचे अग्निशमन दल या बचाव कार्यात सहभागी झाले होते.