ताज्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळंच खुंटेफळ योजनेचे काम-ना.जयंत पाटील

By admin

April 08, 2022

आष्टी प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळंच खुंटेफळ योजनेचे काम मार्गी लागले असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.आष्टी येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी आमदार बाळासाहेब आजबे , युवक प्रदेशाध्यक्ष महबूबभाई शेख, माजी आ,साहेबराव दरेकर ,जिल्हा अध्यक्ष राजेश्वर चव्हाण ,युवक जिल्हाध्यक्ष जयसिंग सोळंके , रेखाताई फड माजी जिप अध्यक्ष शिवाजी राऊत, किशोर हंबर्डे ,सतीश आबा शिंदे, परमेश्वर शेळके ,अण्णासाहेब चौधरी, उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विकास कामांना चालना देणारा व कार्यकर्त्यांना बळ देणारा पक्ष आहे , खुंटेफळ योजनेसाठी आ. बाळासाहेब आजबे यांनी सततचा पाठपुरावा करून काम मंजूर करून घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आमदार बाळासाहेब आजबे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे खुंटेफळ साठवण तलावाचे काम लवकरच सुरू होईल आणि एवढेच नाही तर आपल्या मतदारसंघाला त्यामुळे शाश्वत पाणी मिळणार असल्याचे नामदार जयंत पाटील यांनी आष्टी येथे राष्ट्रवादी परिवार संवाद मेळाव्यात बोलताना सांगितले . आष्टी येथे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या मार्गदर्शनाखाली साईदत्त मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी परिवार संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या दगडफेकी संदर्भात

 

बोलताना पाटील म्हणाले की, ‘आमचे दैवत पवार साहेबांच्या घरापर्यंत जाणारांचा यांचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर पासून मूक आंदोलन करणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ही काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध करावा यामागे कोणाचा हात आहे हे शोधून काढू व खरा चेहरा समोर आणू हे षड्यंत्र कोणाचे आहे हे सर्व जनतेला माहीत असून खरा चेहरा समोर आल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका आहे त्यासाठी आम्ही निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बांधनीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी वेळ द्यावा असे आवाहन शेवटी ना, जयंत पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले

यावेळी बोलताना आमदार बाळासाहेब आजबे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातील विचारवंतंचा पक्ष आहे ,महाराष्ट्र मध्ये पक्षबांधणीसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरू असून या माध्यमातून जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी बुथवाईज बांधणी करण्यात येणार आहे जयत पाटील यांच्यामुळे लवकरच आपल्या मतदारसंघाला खुंटेफळ साठवण तलावाचे काम सुरू होणार आहे, कडा कारखाना सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीतील वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न करावा आम्ही आपणास सर्वतोपरी सहकार्य करू गावागावात बूथ कमिटी तयार असून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या प्राधान्याने काम करत आहेत आज पर्यंत माझ्या मतदारसंघाला मोठ्या प्रमाणात निधी दिल्याबद्दल मी खास करून सर्व जनतेच्या वतीने आपले आभार मानतो व यापुढेही मोठ्या प्रमाणात निधी देताल अशी अपेक्षा बाळगतो असे शेवटी आमदार आजबे म्हणाले ,

माजी आमदार साहेबराव दरेकर नाना यांनी सांगितले की भाजपाने सत्तेचा दुरुपयोग करून चांगल्या माणसाच्या मागे इ डी लावले आहे पवार साहेब हे मोठ्या उंचीचे नेते आहेत पक्षबांधणीसाठी युवकांनी पुढे यावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले ,