शिक्षण

दहावी बारावीचा निकाल वेळेत लावणार-वर्षा गायकवाड

By admin

April 18, 2022

दहावी बारावीचा निकाल वेळेत लावणार-वर्षा गायकवाड

अहमदनगर दहावी ची आणि बारावीचे निकाल वेळेवर लागतील मार्चमध्ये एक मिटिंग झाली आहे… पुढच्या आठवड्यातही एक मीटिंग होणार आहे… साधारणत: पंधरा दिवसाच्या अंतराने दहावी आणि बारावीचा निकाल लागतात यावर्षी ही निकाल वेळेत लागतील असं राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हंटलं आहे…त्या अहमदनगरमध्ये  शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनात बोलत होत्या.

तर राज्यात सध्या सुरू असलेल्या भोंग्याच्या राजकारणावरून शाळा परिसरातील भोंग्याबाबत काही निर्णय होणार का? या प्रश्नाला उत्तर देताना शाळा सुरू झाल्यानंतर त्यावर बोलू असं त्या म्हणाल्या… सोबतच नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण साजरी केली त्यांनी शांतीचा संदेश दिला, देशात एकोपा आणि एकसंघ ठेण्यासाठी प्रयत्न करायला हवे अस वर्षा गायकवाड म्हणाल्या.